मराठी वृत्तपत्र बंद होतील की काय अशी भीती आहे-सुमेध काले

मराठी वृत्तपत्र बंद होतील की काय अशी भीती आहे-सुमेध काले
नाशिक::- मराठी भाषेसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले नाहीतर फार वाईट दिवस येतील मराठी वृत्तपत्र बंद होतील, मराठी शाळा वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जीएसटीचे माजी आयुक्त सुमेधजी काले यांनी केले. ते कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या वतीने तयार करण्यात आलेल्या "असे होते कुसुमाग्रज" या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
           भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना व जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आदरणीय कुसुमाग्रजांनी माय मराठीची गाथा सांगता सांगता व्यथा व अवस्था यावर प्रकाशझोत टाकला. इतर भाषांविषयी आदर बाळगताना मातृभाषेचा अभिमानाने स्वीकार केल्यास समाजमन अधिक सुदृढ, सृजनशील व कणखर होते, या विचारास त्यांनी अधोरेखीत केले. याच विचारांनी प्रेरीत होऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जनमानसात, कुसुमाग्रजांचे विचार रुजविण्यासाठी "कुसुमाग्रज मराठी विचार मंच" ची वाटचाल सुरू आहे.

           संस्थेच्या उद्दीष्टांची, कार्याची कुसुमाग्रज तसेच सांस्कृतिक कार्य, सामाजिक कार्य, भाषाप्रेमी व साहित्य क्षेत्रातील प्रेमींना ओळख व्हावी, म्हणून स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. 
            "असे होते कुसुमाग्रज" या पुस्तकावर आधारित परीक्षेचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. आदिवासी भागातील लहान मुलांवर मराठी भाषेचे पाईक तयार करण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात येतो आहे.
              या स्नेहमेळाव्यासाठी माजी जीएसटी आयुक्त सुमेधजी काले, दारुबंदी विभागाचे माजी संचालक गं.पा. माने, ज्येष्ठ साहित्यिक नरेशजी महाजन, जेष्ठ प्रकाशक वसंतराव खैरनार‌, अध्यक्ष सतीश बोरा, सरचिटणीस सुभाष सबनीस व्यासपीठावर उपस्थित होते. पुस्तकाच्या निर्मिती बाबत अलका कुलकर्णी आणि आरती डिंगोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश बोरा यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. अंजना भंडारी यांनी केले तर आभार नंदकिशोर ठोंबरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी दिलिप बारवकर, रामदास शिंदे, जयप्रकाश मुथा, उपेंद्र वैद्य, सुमती पवार, सुहासिनी वाघमारे यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

  1. मराठी भाषेचे होत असलेले नुकसान आणि मराठी वृत्तपत्राची दुर्दशा या दोन्हीमध्ये फरक आहे. मुळात वृत्तपत्रांनीच मराठीची वाट लावली आहे आणि वृत्तपत्रांच्या दुर्दशेलाही ते स्वतःच जबाबदार आहेत

    उत्तर द्याहटवा
  2. मराठी वृत्तपत्र टिकली पाहिजेत याबद्दल दुमत असण्याचे कोणतेही कारण नाही. मराठी वृत्तपत्र जगविण्यासाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणजे अधिकाधिक मुले मराठी भाषेत बोलतील लिहितील वाचतील आणि त्यातूनच वृत्तपत्र देखील वाचली जातील पण सरकारचे नेमके उलटे धोरण आहे खाजगी शाळांना प्राधान्य देण्याच्या नादात मराठी शाळांकडे दुर्लक्ष होत आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

१०० खाटांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण ! महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणार-पालकमंत्री दादाजी भुसे

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,