पोस्ट्स

बालकांमधील ऍडेनॉईड व टॉन्सिल समस्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक — डॉ. पंकज भट

इमेज
जागतिक श्रवण दिनानिमित्त बालकांमधील ऍडेनॉईड व टॉन्सिल समस्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक — डॉ. पंकज भट नाशिक ::- ३ मार्च रोजी साजरा झालेल्या जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने बालकांमधील ऍडेनॉईड हायपरट्रॉफी आणि टॉन्सिलायटिस या सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या समस्यांबाबत पालकांनी सजग राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पंकज भट यांनी केले आहे. या आजारांचे वेळेवर निदान आणि उपचार न केल्यास मुलांच्या श्रवणशक्तीवर, श्वसनावर तसेच एकूण आरोग्य व विकासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.        डॉ. भट यांनी सांगितले की, ऍडेनॉईड हायपरट्रॉफी म्हणजे नाकाच्या मागील भागातील ग्रंथींची असामान्य वाढ होणे, तर टॉन्सिलायटिस म्हणजे घशातील टॉन्सिलला सूज आणि संसर्ग होणे. हे दोन्ही आजार विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. तोंडाने श्वास घेणे, झोपताना घोरणे (स्नोरिंग), वारंवार घसा दुखणे, ताप येणे, सतत सर्दी-खोकला होणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. अनेक वेळा मुले झोपताना किंवा खेळताना तोंड उघडे ठेवून श्वास घेताना ...

शहरातील बड्या विकासकाने जमीन हडप केल्याचा सुनिता दोंदे यांचा आरोप, न्याय न मिळाल्यास दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा !

इमेज
शहरातील बड्या विकासकाने जमीन हडप केल्याचा सुनिता दोंदे यांचा आरोप,  न्याय न मिळाल्यास दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा !              नाशिक::- सातपूर च्या अशोकनगर भागातील गट क्र. ४९२ व ४९३ संदर्भातील कथित जमीन हडप प्रकरणात न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदार सुनिता प्रभाकर दोंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी महसूल प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.        या संदर्भात दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी तसेच यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार दिल्याचे त्यांनी  सांगितले. जितेंद्र मनोहरदास ठक्कर, शामसुंदर रामकिसन लाहोटी, लिलाबाई शामसुंदर लाहोटी, सोनल कपिल लाहोटी, कपिल शामसुंदर लाहोटी व इतर अनोळखी व्यक्तींनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून सन १९८० मध्ये फेरफार नोंद क्रमांक २९३५ व २९३६ द्वारे महसूल अभिलेख ७/१२ मध्ये बेकायदेशीररीत्या नावे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.   ...

राज्यातील ३७ महिलांना 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार' जाहीर ! मुंबईच्या रोहिणी पराडकर तसेच नाशिकच्या डॉ. नाझिया सय्यद व पूजा पवार यांनाही पुरस्कार जाहीर !

इमेज
राज्यातील ३७ महिलांना 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार' जाहीर !  मुंबईच्या रोहिणी पराडकर तसेच नाशिकच्या डॉ. नाझिया सय्यद व पूजा पवार यांनाही पुरस्कार जाहीर ! नासिक (वार्ताहर)::-  शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन आणि यशिता गार्डन नर्सरी  यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज जागतिक महिला दिनानिमित्त या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.  राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतरांना व्हावी, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  राज्यातील ३७ महिलांना ‘कर्तृत्ववान महिला’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये : डॉ. नाझिया माजिद सय्यद (नाशिक); वनश्री साहेबराव महालकर (यवतमाळ); ताई सुरेश लांडे (धाराशीव); सौ. रोहिणी अमोल पराडकर (मुंबई); वंदना सालवटकर (वर्धा); संगीता तुळशीराम पवार (मुंबई); सुरेखा तात्याबा चौरे (सोलापूर); सरला शामराव कामे (छत्...

सबलांना मानाचा सलाम ! आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्राध्यापक विजय कोष्टी यांचा लेख

इमेज
सबलांना मानाचा सलाम ! रविवार ,  ८ मार्च रोजी जगभरात  आंतरराष्ट्रीय महिला दिन  साजरा होत आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव ,  त्यांच्या हक्कांची जाणीव आणि लैंगिक समानतेसाठी ठोस कृतीचा संकल्प - या त्रिसूत्रीवर उभा असलेला हा दिवस यंदा  ‘ मिळवण्यासाठी द्या’ (‘ Give To Gain ” ’)या आशयघन विषयावर साजरा होत आहे. या थीमचा अर्थ अत्यंत व्यापक आणि प्रेरणादायी आहे   देण्यातूनच खऱ्या अर्थाने प्राप्ती होते .  समाजाने जर महिलांना शिक्षण ,  संधी ,  सुरक्षितता आणि सन्मान दिला ,  तर त्या बदल्यात समाजाला मिळते - प्रगती ,  समृद्धी ,  स्थैर्य आणि संवेदनशील नेतृत्व.  ‘ मिळवण्यासाठी द्या’ हा संदेश केवळ महिलांसाठी नसून संपूर्ण समाजासाठी आहे.मुलींना दर्जेदार शिक्षण द्या-राष्ट्राला सक्षम नागरिक मिळतील.महिलांना निर्णयप्रक्रियेत स्थान द्या - धोरणे अधिक समतोल आणि सर्वसमावेशक होतील.समान वेतन आणि समान संधी द्या - अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल.इतिहास साक्षी आहे की जेव्हा स्त्रियांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक दिले आहे. मग ते रणांगण असो ,...

स्री कालची आणि आजची ! महिला दिनानिमित्त विजय सातपुते यांचा लेख

इमेज
स्त्री कालची आणि आजची                 रामायण  आणि महाभारत  ही आपली महाकाव्ये.  या दोन पौराणिक कथानकातून स्त्री ची विविध रूपे समोर आली.  अहिल्या,  द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या लेखक स्त्रिया महान पतिव्रता म्हणून जनमानसात रूजल्या गेल्या.  यांचे केवळ स्मरण केल्याने महापातकांचा नाश होतो  असे संस्कार या काळात केले गेले.           संत वाङमय,  पंत वाड़मय आणि शाहिरी फड यातून वर्णिलेली स्त्री लोकसाहित्याचा विशेष भाग ठरली. जनमानसात खोलवर रूजलेली ही स्त्री,  समस्त नारीशक्ती समाजाशी संवाद साधत गेली. माया, ममता  आणि करूणा या भावनांच्या मुशीतून घडलेली ही स्त्री  त्याग, समर्पण  आणि विश्वास या  त्रिसूत्रीतून स्वतःला, कुटुंबाला,  समाजाला घडवीत गेली.             पौराणिक  काळातील स्त्री पातिव्रत्य, हे अस्त्र समजून स्वसंरक्षण करीत गेली. सत्यवती, माद्री,कुंती गांधारी, सुनिती ,सुरूची , आदिती,  छाया, अनुसया,  ...

राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

इमेज
राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी, कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे रविवार २५ जानेवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. यानिमित्ताने हा लेख… २५ जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी, २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. स्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतर, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपवण्यात आली. त्यामुळे भारतीय लोकशाहीत २५ जानेवारी या दिवसाला अतिशय महत्व आहे. तथापि, नागरिकांना आपल्या मताची किंमत उपयोगिता, महत्व आणि कर्तव्य कळावे यासाठी २५ जानेवारी २०११ पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा होतो. २०२६ हे वर्ष राष्ट्रीय मतदार दिनाचे १६ वे वर्ष आहे. निवडणूक आयोगाने यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रीद वाक्य 'माझा भारत माझे मत ' हे ठेवले आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश ...

थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२५–२६ जाहीर !

इमेज
थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२५–२६ जाहीर ! नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी ३ जानेवारी रोजी महिला शिक्षिकांना दिला जाणारा थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार सन २०२५–२६ साठी जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शिक्षिकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. सन २०२५–२६ करिता जिल्ह्यातील सर्व गटांतून प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत गट बदल करून सखोल पडताळणी व गुणांकन प्रक्रिया राबविण्यात आली. शिक्षिकांचे वर्गस्तरीय अध्यापन कार्य, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न, सहशालेय उपक्रम, सामाजिक व शैक्षणिक योगदान या विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांमधून शासनाने ठरवून दिलेल्या किमान अटी व शर्ती तसेच सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शिक्षिकांमधून एकूण १५ गुणवंत शिक्षिकांची निवड करण्यात आली. ही निवड अध्यक्ष, जिल्हा गुणवंत शिक्षिका पुरस्कार निवड समिती तथा प...

पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद

इमेज
पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद नाशिक : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सायंकाळी  दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड या गावातील साबळे कुटुंबाच्या घरी नागलीची भाकरी, उडीदाचे वरण आणि हरभऱ्याच्या भाजीचा आस्वाद घेतला. राज्याच्या प्रथम नागरिकाने आपल्या घरी भोजनाचा आस्वाद घेतल्याने साबळे कुटुंबीय भारावले होते.            हिरामण शंकर साबळे यांचे गावात साधे घर आहे. त्यांच्या घरी राज्यपाल महोदय जेवणाला येणार, अशी माहिती मिळताच त्यांनी तयारी सुरू केली. घराला रंग रंगोटी केली. प्रवेशद्वाराच्या भिंती वारली चित्रकलेने साकारली होती. साबळे कुटुंबातील गोजरताईने राज्यपालासांसाठी लाल, पांढरी नागली आणि बाजरीच्या भाकरी, अळू आणि वर्कण कंदाची भाजी, हरभराची भाजी, उडीदाचे वरण तयार केले होते. राज्यपाल श्री. देवव्रत यांच्यासमवेत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे यांच्यासह साबळे कुटुंबातील सदस्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांनी स्थानिक पिके, जीवनमान या विषयी माहिती घेतली....

नैसर्गिक शेती काळाची गरज-राज्यपाल आचार्य देवव्रत, खते, कीटकनाशकांचे अंश अन्नधान्यात आढळून येत आहेत. या अन्नधान्यामुळे मानवी प्रतिकार क्षमता कमी होऊन दुर्धर आजाराचे रुग्ण वाढत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. जमिनीची जलसंधारणाची क्षमताही कमी झाली आहे.

इमेज
नैसर्गिक शेती काळाची गरज-राज्यपाल आचार्य देवव्रत सह्याद्री फार्म येथे शेतकरी, कृषी सखींसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी साधला संवाद           नाशिक : रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अती वापराने देशातील सुपीक जमीन नापीक केली आहे. नापीक जमीन सुपीक बनवून  आत्मनिर्भर भारत करण्यासाठी नैसर्गिक शेती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.            दिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे आयोजित नैसर्गिक शेती संवादात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,  पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार,  विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे उपस्थित होते.            राज्यपाल म्हणून नव्हे, तर श...

जि. प. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेला वेग; आणखी ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन, आतापर्यंत एकूण २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई

इमेज
जि. प. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेला वेग; आणखी ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन आतापर्यंत एकूण २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई नाशिक : जिल्हा परिषद नाशिकमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र (UDID Card) पडताळणी मोहिमेला गती देण्यात आली असून बोगस, अपूर्ण अथवा नियमबाह्य दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सवलती घेतल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी कठोर भूमिका घेत कारवाई सुरू ठेवली आहे. या मोहिमेंतर्गत आज आणखी १ मुख्याध्यापक व ४ शिक्षक अशा एकूण ५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बागलाण तालुक्यातील १ मुख्याध्यापक तसेच इगतपुरी, मालेगाव, सिन्नर व सुरगाणा तालुक्यातील प्रत्येकी १ शिक्षकाचा समावेश आहे.            पडताळणी प्रक्रियेदरम्यान दोन शिक्षकांनी अद्याप UDID प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आढळून आले. तसेच एका मुख्याध्यापक व एका शिक्षकाने UDID प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर नवीन UDID प्रमाणपत्र सादर न केल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय ...